लसीकरण की राजकारण

मागच्या काही दिवसात कोविड,लसीकरण संदर्भात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातल्या काही प्रमुख मुद्दे

*मागील 24 तासात तब्बल एक लाख पंधरा हजार राहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, हा आजवरचा देश पातळीवरचा उच्चांक आहे. तसेच महाराष्ट्रात बेड्स, रेमडेसिविर,ऑक्सिजन तसेच आवश्यक मनुष्यबळ यांचा भीषण तुडवडा निर्माण झाला आहे. जे डॉक्टर्स, कर्मचारी अव्याहतपणे काम करत आहेत, ते हा भार आणखी कितपत सोसतील, याविषयी काही सांगणं कठीण आहे.

*महाराष्ट्रात करोना लसीचे केवळ 14 लाख डोस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे दिवसाला पाच लाख डोस द्यायचं म्हटलं तर केवळ तीनच दिवस पुरणार आहे लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत – राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे

*काही राज्य सरकारे लसीकरणाच्या पुरवठा बद्दल पराकोटीचा तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती असल्याचं खोटं चित्र उभं करत आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणात आहे – केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन

*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी तसेच आय एम ए सारख्या संस्थेने 18 /25 वर्षे वयोगट पुढील नागरिकांना लक्ष देण्याची मागणी केंद्राला पत्राद्वारे केली आहे

*फुटकळ कारणे देऊन आरोग्य व्यवस्थेतील फ्रन्टलाइन वर्कर्स यांचं लसीकरण रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आलं आहे

*15 मार्च पर्यंत आपण देशात जेवढ्या लसी पुरवत होतो त्याच्या दुप्पट प्रदेशात पाठवत होतो सभागृहात आरोग्य मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी होती- भारत देशात 5.94 कोटी लसी पाठवल्या तेव्हा देशात तीन कोटी लसी दिल्या गेल्या

*Pfizer कंपनीने देशामध्ये आपत्कालीन वापरासाठी पुरवठादार बनवण्याची मागणी आज मागे घेतली आहे

* 19 एप्रिल पासून अठरा वर्षापुढील प्रत्येक अमेरिकन नागरिकाला प्लस मिळेल – जो बिडेन

* मागच्या वर्षभराच्या लॉकडाऊन आणि तत्सम अनुभवाने शहाणे केल्यानंतर सेकंड वेव्ह चा इशारा जगभरातील तज्ञ देत असताना सत्ताधाऱ्यांनी नेमकी काय दक्षता घेतली,काय उपाययोजना केल्या, याविषयी काही माहिती कळू शकेल काय??


* सर्व पक्षांना त्यांच्या पक्षप्रमुखांना पक्ष कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती – सगळ्या प्रचार सभा निवडणुका संपल्या असतील तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हरकत नाही. नंतर सगळं वसुली, खंडणी, दीदी ओ दीदी ,हिंदू-मुस्लिम, मंदिर- मस्जिद सुरू करता येईल, त्याबद्दल निश्चिंत रहा. काळजी नसावी, शेवटी आपला देश आहे.

* देशभरात आरोग्यव्यवस्थेची अशी अनागोंदी सुरू असताना ,ऐन ‘आरोग्य दिनाचं’ औचित्य साधून महामहीम प्रधानसेवक ‘ परीक्षा पे चर्चा’ नामक अतिशय महत्वाचा ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न हाताळत आहेत.

* आपणास आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

असंबद्ध प्रश्नांची गोळाबेरीज

“प्रश्न असा आहे की, कोणाचं जीवन संपूर्ण सुसंगत असतं?माणूस म्हटला की contradictions आणि परस्पर विरोधी तपशीलाशिवाय दुसरे काही सापडायचं नाही.” ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या आगळ्यावेगळ्या फॉर्म मधल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत किरण नगरकर हे वाक्य जेव्हा वापरतात तेव्हा नकळत तिच्या गाभ्यातील प्रयोजनाचा,तिच्यातील पात्रांच्या प्रवाहाचा, भावनिक गुंतागुंतीचा भाषिक अनुवाद करत असतात.येनकेन प्रकारेण मनुष्य योनीत जन्म झालेल्या जिवाचा पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत मांडल्या गेलेल्या उभ्या-आडव्या पटावर वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे ‘स्व’त्वाचे निदर्शक असणारे कित्येक ठिपके ठाण मांडून बसलेले असतात, त्या असंबद्ध ठिपक्यांना तितक्याच असंबद्ध शैलीद्वारे कागदावर जोडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘सात सक्कं त्रेचाळीस’!!

अर्थात, त्यांची पहिली आणि मराठीतली शेवटची कादंबरी. कादंबरी या अर्थाने की यात ‘कुशंक पुरंदरे’आपल्याला लेखकाच्या मनातली गोष्ट सांगणारा माध्यम आहे. सोबत मोजकीच पात्रं आहेत, ते आपली आपली ठाम भूमिका उराशी बाळगून अवती भवती वावरताहेत. अनेक संवादी विसंवादी प्रसंगातून उभारलेलं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसे फ्लॅशबॅक, जम्पकट्स ही सहसा सिनेमात आढळणारी तंत्रे इतक्या वेळा, इतक्या तऱ्हेने कादंबरीचा ताबा घेतात की एकूण लिखाणाच्या फॉर्म,आकृतिबंधाविषयी शंका घेण्यास वाव मिळतो. सहसा प्रचलित एकरेषीय कादंबऱ्यांमध्ये मूळ नायकाच्या भूमिकेला विसंगत ठरवू पाहणाऱ्या प्रसंगांची, कथानकांची मांडणी एका विशिष्ट मर्यादेनंतर उभी राहत नाही. नगरकरांनी त्यांच्या लिखाणासाठी पुरेसे स्वातंत्र्य घेताना याच मुद्द्याला हात घातला आहे.

सबंध कादंबरीभर ‘हाईड अँड सीक’ चा खेळ खेळणारी पात्रं ओळखीची वाटतात. “Wont you ever understand, Kushank? The trick is in seeing obvious” म्हणणारी आरोती, तिचं कुटुंब, प्राचिंती,रघु, सधन,ओखोन,चंदनी,रशीद, काकू आपले अस्तित्व काळाच्या पटलावर दाखवून देतात. आणि अक्षरशः ‘य’वेळा येणारी ‘तू’!! ‘तू’या संबोधनाशी ‘कुशंक’चा मुक्त संवाद अखंड चालू राहतो. नगरकरांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची व संवादांची उंची, त्यातले सातत्य आणि वेगळेपण जपले आहे.मुंबई, पुणे,नंदीढेला वेळोवेळी आपली भौगोलिक ,सांस्कृतिक वैशिष्ट्यचिन्हे अंगावर वागवत भेटतात. मराठी सोबतच हिंदी, इंग्रजी भाषांचं पानापानावर रेंगाळणं या कादंबरीच्या स्वतःच्या फॉर्म विषयी असणाऱ्या प्रामाणिकपणाचा दाखला आहे. सहज बोलता बोलता पात्रं वैश्विक तत्वज्ञानाला अलगद कवेत घेतात. त्यात कुठलाही बोजडपणाचा, बडेजावाचा अंश सापडत नाही. जागोजागी असणारी स्वगतं त्याच्या आंतरिक उपरेपणाच्या, हव्यासाच्या,न्यूनगंडाच्या,क्वचित अहंपणाच्या गोष्टी सांगतात. प्रवाही कथनशैली वाचकांना खिळवून ठेवते मात्र कथानकाची सूत्रं जोडू पाहणाऱ्या नवख्या वाचकांची दमछाक होण्याची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“जन्माला आल्यावर चापट मारली की आपले चोचल्याचे दिवस संपले, हे लगेच समजायला हवं..जितक्या लवकर हे आपल्याला समजतं तितके आपले हाल व कष्ट कमी” अशी धारणा अंगी बाळगलेला कुशंक जगण्याच्या तिन्ही मितींविषयी डोळस आस्था बाळगणारा आहे. चौथ्या मितीला हाका मारत, चाचपडत,गोंजारण्याचा अथक प्रवास सुरू आहे.”प्रत्येकाकडे एक काळोख असतो.. प्रत्येकाच्या काळोखाची आकृती वेगळी.. तुझ्या कोंडलेल्या काळोखात कोण राहतं?”असा प्रश्न विचारून तो गहन चित्त- प्रवृत्तीचं दर्शन घडवतो. रंग, गंध, स्पर्शाच्या ताकदीची उपजत समज त्याला आहे. इहलोकाच्या भौतिक सुखामागे धावण्याची अनिवार ओढ तसेच धावून धावून रस्ता संपल्यानंतर मागे उरणाऱ्या अपूर्णतेशी स्वैर रोमान्स करण्याची त्याची मनस्वी तयारी आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावविशेषांची तो परखड तर्कशुद्ध चिकित्सा करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो. निराशेची सावली त्याला कधी कधी alienation कडे झुकवते, तरी तो हतबुद्ध ,भावनाविवश होत नाही. “अजून जगभर भविष्य ओसंडते” म्हणताना त्याचे डोळे आश्वासक उमेदीने चमकून जातात. जगभरातल्या कुठल्याही सेन्सिबल माणसाला असणाऱ्या ‘मृत्यू’ नावाच्या संकल्पनेविषयी असणारं टोकाचं आकर्षण त्याच्या मेंदूत नवनवे प्रश्न तयार करतं. आयुष्यभर प्रेयसीने वारंवार विचारलेल्या ‘क्या फर्क पडता है?’ ला तो सफाईदारपणे ‘पडता है ,पडता है, पडता है!’ म्हणून वेळ निभावून नेतो. शेवटी मात्र विविध अनुभवांती आपल्या उत्तराचं फोलपण जाणवणं, त्याचा विषाद, त्याची खंत बोचल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही आटपाट गाव- नगर- शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं मूलभूत प्रयोजनच ‘पेटंट नॉन्सेन्स’ असल्याचे भास त्याला सतत होत असल्याने त्याचे विचार विश्व ढवळून निघते. नगरकरांनी ‘डार्क ह्युमर’चे निरनिराळे शेड्स वापरून कादंबरीला नैराश्याची नोंदवही होण्यापासून रोखले आहे,हे त्यांचं निर्विवाद यश म्हणावं लागेल. अभिजात कथन शैलीला भाषिक सौंदर्यसौष्ठवाची जोड लाभल्याने कादंबरी विलक्षण परिणामकारक ठरते.

किरण नगरकर यांची ओळख मला (आणि कदाचित समवयस्क बहुसंख्य मराठी भाषिक वर्गाला) होण्यासाठी त्यांच्या मृत्यूचा योग येणे ही वेगळ्याच प्रकारची शोकांतिका म्हणावी लागेल. तसा इंग्रजी साहित्य विश्वात दबदबा असलेला, साहित्य अकादमीचे कित्येक पुरस्कार खिशात असणारा,इतकेच काय तर जर्मनीचा सर्वोच्च मानाचा ऑर्डर ऑफ मेरीट ने नावाजलेला हा अस्सल अभिरुचीसंपन्न लिखाणातला कमाल उंचीचा माणूस!!तत्कालीन मराठी समीक्षक(अपवाद वगळता) आणि वाचकांकडून उपेक्षा झालेली. इंग्रजीमध्ये ‘बेड टाइम स्टोरी’, ‘ककोल्ड’, ‘रावण अंड एडी’, ‘गॉड्स लिटल सोल्जर’ सारखी प्रचंड गाजलेली पुस्तके नावावर असणारा प्रथितयश लेखक तथाकथित ‘सत्ताकेंद्रे’,’सेन्सॉरशिप’ च्या नादी न लागता आपल्याला वाटेल त्या विषयावर, रुचेल त्या भाषेत खुल्या दिलाने लिहीणारा होता. ‘वाचक अनुनय’ कितपत करावा याची उत्तम जाण असणारा, लेखन मूल्यांशी प्रामाणिक असणारा स्वभाव त्यांना हयातीत लोकप्रियता मिळवून देऊ शकला नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लेखनाला विशेषतः नवीन पिढी कडून लाभलेलं प्रेम,’कल्ट स्टेटस’ त्यांना अजरामर करून जाईल याबाबत शंका वाटत नाही.

या कादंबरीतली काही आवडलेली अवतरणे इथे देण्याचा मोह आवरत नाही..

*काळ अख्ख्या जगभर पसरलाय. अस्ताव्यस्त आणि बारकाईने. देवाकडे एक अफाट जगभर पोतं आहे आणि देवाला झाली घाई.सैरावैरा ओक्साबोक्शी क्षण न क्षण तो त्या पोत्यात कोंबत आहे. या इथून त्या तिथपर्यंत. देवाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. जेव्हा देवानं पहिला गोष्टीला हात लावला, तेव्हापासून वर्तमानाचं नरडं दाबून भूत बनवण्याचा त्याचा एकाकी धंदा .झपाटलंय त्याला आणि तो आपल्याला झपाटतोय. त्याचं काम कधी संपत नाही. घामानं थबथबलाय तो!

*We’re all going to die anyway and it is good to tell when one likes and good to know one is liked.You see,I don’t need your desperately or lovingly or longingly or Anything of the kind or may be this itself is a desperation and longing, needing someone this way- how do I know? But you are just there and it is quite frustrating and not right when you are not.I am not happy or dissatisfied.I’m not.And I don’t call you up in particular moods,but it seems natural.It is right when I feel deeply,it is you whom I must tell.

*माणूस कितीही मुक्त झाला असला तरी तो स्वतःला कुठेतरी आणि कोणाशी तरी बांधून घेतो. मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या प्रवृत्तीची किंवा त्या नेमक्या बंधनाची कारणं हजार देईल पण human bondages चा मुद्दा अटळ.बंधनं आवडती असोत,नावडती असोत वा भूतकाळातली. आपण बांधलेले.पटली नाहीत आणि झिडकारायचे वा सुटकेचे हजार मार्ग सापडले,तरी बांधलेले!!

*मला काही काही गोष्टी समजतच नाहीत. त्या घडत असताना मी त्यांना बघतो.डोळे उघडे ठेवून .त्यांच्याबरोबरचा क्षुल्लक, असंबद्ध, विनाकारण तपशील मी टिपून घेतो. सगळ आठवतं मला. जसं घडलं तसं; पण आतापर्यंत लागेबांधे नसलेल्या संकटात गुरफटून बसलेल्या त्या एका घटनेला अचानक वाचा फुटते.इतक्या दिवसांची वांझोटी, कोणाच्या अध्यात ना मध्यात विधवा पण सती सावित्रीच्या संकटासारखे बोकाळते, माझ्या नकळत तो सारा काळ, तिनं असंख्य परिणाम होऊ घातलेले असतात. स्वतःचा एक स्वतंत्र संदर्भ निर्माण करते आणि माझ्या सार्‍या जीवनाला त्यात गुंतवते.

रूह को राहत देने वाला शायर

मुशायरे के मंच पर चुनिंदा लोग ..श्रोताओं में कुछ चुप्पी कुछ उदासी ..माहौल में भारीपन भरा हुआ.. एक के बाद एक शायर लोग अपनी ग़ज़ल कहकर जगह पकड़ लेते हैं .फिर एक नाम पुकारा जाता है..अचानक से हड़बड़ाहट पैदा होती है.. लोगों के तालियों सीटीयों और जिंदाबाद के नारों से समा गूंज उठता है.फिर उस शख्स के एक इशारे से खामोश होकर उसकी गजलों की बारिश में भीगते हुए तारीफों के पुल बांधते मुरीद बन जाते हैं. पिछले पांच दशक से इसी तरह से मुशायरा लूट लेने वाले अहद-ए-हाजिर के मशहूर-ओ- मारूफ शायर राहत इंदौरी साहब अब हमारे बीच नहीं रहे.

इंदौर में जन्मे राहत कुरैशी ने नूतन स्कूल में शिक्षा प्राप्त करने के बाद इंदौर विश्वविद्यालय से उर्दू में और ‘उर्दू मुशायरा’ शीर्षक से पीएचडी की डिग्री हासिल की. शुरुआती दौर में घरेलू हालत खस्ता होने के कारण वह सड़कों पर लिखावटी एवं चित्रकारिता का भी काम करते थे.साथ में शायरी में भी गजब दिलचस्पी रखते थे. एक मुशायरे के दौरान नामचीन शायर जाँनिसार अख्तर साहब (जावेद अख्तर साहब के वालिद) से मुलाकात हो गई.ऑटोग्राफ लेते समय उन्होंने अपनी शायरी के दिलचस्पी का जिक्र किया तो जाँनिसार साहब मुस्कुरा कर बोले, मियां, शेर लिखने से पहले 1000 शेर मुंह जबानी याद कीजिए. तपाक से इंदौरी साहब बोले वह तो मुझे पहले से ही याद है जवाब में जानिसार साहब फ़रमाए, तो देर किस बात की है, फौरन लिखना शुरू कीजिए.फिर कभी राहत इंदौरी साहब ने पीछे मुड़कर नहीं देखा. कहा जाता है कि उनकी शायरी पर मशहूर शायर कैसर इंदौरी साहब का बड़ा प्रभाव था,जिसके चलते उन्होंने शायरी की बारीकियों को समझा, फिर अपने अंदाज़ से चार चाँद लगाते गए.

उर्दू अदब के चाहने वालों ने राहत साहब की शायरी और गजलों को बेहिसाब मोहब्बत बक्शी .उनकी शायरी में वतन से इश्क, सियासत से नाराजगी और नौजवानों की उलझन साफ नजर आती है. इसी के चलते लंबे अरसे तक, बच्चों से बुजुर्गों तक उन्हें काफी पसंद किया जाता था.

भाषा की गहरी समझ ,आवाज के माहिराना उतार-चढ़ाव और शेर पढ़ने का अपना एक निराला अंदाज श्रोताओं को दीवाना बना देता था. जिंदगी की आम बातों को स्वच्छता और सलीके से गजलों में कहा जाना उनकी खासियत थी.

आँखों में पानी रखो,होटों पे चिंगारी रखो

जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो

अपनी रचनाओं में मोहब्बत की खुशबू गूंधने वाले राहत साहब तमाम जवां दिलों की धड़कनों को भलीभांति समझ कर अपने कलम में कैद करने का माद्दा रखते थे.उन्हीं द्वारा लिखित एक किताब ‘दो कदम और सही’ में वे कहते हैं…

उसकी याद आयी है,साँसों जरा धीरे चलो

धड़कनों से भी इबादत में ख़लल पड़ता है

या फिर उन्हीं का लिखा एक और शेर उनकी इश्कजदा कारागिरी की मिसाल है..

कल तेरा ज़िक्र छिड़ गया था घर में

और घर देर तक महकता रहा

मुश्किलों भरी निजी जिंदगी के साए कलम की स्याही पर रेंगने पर वह खुद को नहीं रोक पाते थे. बीते दौर की कठिन घड़ियां और मौजूदा हालात की बेबसी उनके लफ़्ज़ों को तीखापन प्रदान करती थी.

जुबाँ तो खोल,नज़र तो मिला, जवाब तो दे

मैं कितनी बार लूटा हूँ,हिसाब तो दे

कई दफा राहत साहब कहते थे ,मेरा शहर अगर जल रहा है और मैं कोई रोमांटिक गजल गा रहा हूं तो अपने फन अपने देश अपने वक्त से दगा कर रहा हूं .नए दौर के हुक्मरानों से तीखे सवाल करके आम आदमी की हालात का मुआयना कर ‘साहिबे मसनदों’ को जगह दिखाने का काम उन्होंने बखूबी निभाया.

जो आज साहिबे मसनद हैं, कल नहीं होंगे

किरायेदार हैं, जाती मकान थोडी है,

सभी का खून शामिल है, यहाँ की मिट्टी में

किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी है!

अपने वतन की फिक्र करते रहे राहत साहब मौकापरस्त सरकारों की नीतियों पर कड़ा प्रहार करते थे. मजहबी वारदातें,बढ़ती द्वेषमूलक मानसिकता, दहशती माहौल से वे आए दिनों सख्त नाराजगी बेबाक़ी से जताते रहे.मुल्क से बेइंतेहा प्यार उनके शायरी में कई बार झलकता है.

जब मैं मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना

लहू से मेरे माथे पर हिन्दोस्तान लिख देना!!

देश के नौजवानों से उन्हें कई उम्मीदें थी, पर दिन-ब-दिन उनकी बदहाली ,बेबसी पर भी वह खुलकर बोला करते थे.व्यवस्था की खामियों पर उंगली उठाकर तब्दीली की जोरदार अपील भी उन्होंने की.बेहतर राष्ट्र की नींव रखने से पहले युवाओं के सक्षमीकरण की मांग को ऊंची आवाज में बुलंद किया.

कॉलेज के बच्चे चुप हैं काग़ज़ की एक नाव लिए

चारों तरफ दरिया की सूरत फैली हुई बेकारी है

इंदौर विश्वविद्यालय में प्रोफेसरी करते-करते उन्होंने कई फिल्मों के खूबसूरत गाने लिखे. पर फिल्मी दुनिया उन्हें रास नहीं आई. उर्दू साहित्य जगत में राहत साहब ने लिखी हुई ‘नाराज़’,’चाँद पागल है’,’रुत’,मेरे बाद’ जैसे कई किताबों ने काफी वाहवाही बटोरी, अपना एक अलग मुकाम हासिल किया.मुशायरों में उनका रोम-रोम निखरता था. वे उसी के लिए बने थे.हाल ही में उन्होंने मुशायरों के जरिए अवाम में इल्म की रोशनी बिखेरने के बजाए सस्ते मनोरंजन को बढ़ावा देने के रवैय्ये से सख्त नाराज़गी जाहिर की थी.आला दर्जे की हिंदी उर्दू गजल की आवाज आम आदमी से वाकिफ कराने वाले चुनिंदा मशहूर शायरों में उनका काफी ऊंचा स्थान रहा.

उनके द्वारा लिखे गए शायरी में ‘मौत’ ने काफी बार दस्तक दी है. मूलतः गंभीर पर मुलाकातों में खुशमिजाज किस्म के इस शख्सियत ने मौत से संबंधित कई पहलू बेहतरीन ढंग से उजागर किए. अपने जीते जी अपनी मौत, अपनी मजारों के मंजर बयान करने वाला शख्स दुनिया में जिंदादिली पैदा करता गया.

दो गज़ ही सही,मेरी मिल्कियत तो है

ऐ मौत, तूने मुझे जमींदार कर दिया

आज उर्दू गजल के काफ़िये,मतले,रदीफ़ गमगीन हैं.राहत साहब के चहेतों को इस सदमे से उभरना काफी मुश्किल होगा. पिछले बरस एक मुलाकात में उन्होंने कहा था,’मैं अक्सर सोचता हूँकि ऐसी दो लाइनें अब तक नही लिखीं,जो 100 साल बाद भी मुझे जिंदा रख सके, जिस दिन यह ख़बर मिले की राहत इंदौरी रुख़सत हो गए हैं, समझ जाना कि वो मुकम्मल दो लाइनें मैंने लिख ली हैं. आप देखियेगा मेरी जेबें.. मैं वादा करता हूँ..वो दो लाइनें आपको मिल जाएंगी’..!!

आने वाली पीढ़ियां इस हुनरमंद शख्स और उसकी शायरी को किन गहराईयों तक जाकर देखेंगी,यह तो वक्त ही बताएगा. पर हिंदी उर्दू ग़ज़ल की तहजीब की मंजिल इस बेमिसाल शायर के मीनार के बिना हमेशा ही अधूरी रहेगी.अलविदा राहत साहब….. खुदा आप को जन्नत नसीब फरमाए…. आमीन..!!!

अब ना मैं हूँ, ना बाकी हैं जमाने मेरे

फिर भी मशहूर हैं शहरों में फ़साने मेरे!!

ऍनिमल फार्म ते इंडियन ऍनिमल फार्म!

सन 1945.. म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वी..नाव ..खरं नाव एरिक आर्थर ब्लेयर.. टोपण नाव जॉर्ज ऑर्वेल…या अवलियाने निव्वळ 112 पानांची एक कादंबरी लिहिली ..नाव होतं ‘ॲनिमल फार्म’..त्याची स्वतःची समाजवादी लोकशाही विषयीची असणारी पराकोटीची आस्था तसेच

फॅसिजम आणि स्टॅलिनीजमला असणारा आत्यंतिक विरोध या कादंबरीच्या जन्मास कारणीभूत ठरला .उपरोधिक भाषा शैलीचा प्रभावी वापर करून प्रस्थापित एकाधिकारशाहीला बोचकारत कथानकातील क्रांतिकारकांच्या चुकांवर बोट ठेवण्यात तो कमालीचा यशस्वी झाला. सुरुवातीला प्रकाशित होण्याआधी हजारो नकार पचवल्यानंतर जेव्हा ‘कोल्ड वार ‘सुरु झाल्यानंतर अमेरिकेत पहिली आवृत्ती निघाली,त्यावेळी यशाचे कित्येक कीर्तिमान स्थापित झाले. ‘टाईम’ सारख्या मासिकाने शतकातल्या सर्वोत्तम 100 कादंबऱ्यांमध्ये समाविष्ट करून यथोचित सन्मान मिळवून दिला. त्यातली ‘All animals are equal,but some animals are more equal than others’असो वा’Man serves the interest of no creature except himself’ किंवा मग ‘If liberty means anything at all means the right to tell people what they do not want to hear’ या सारखी अवतरणे अजरामर झालेली आहेत.

यानंतर येते एक मराठी कादंबरी.. 2019 साली.. लेखक आहेत प्रवीण दशरथ बांदेकर ..नाव ‘इंडियन ॲनिमल फार्म’ ..मूळ ऑर्वेलच्या कादंबरीचा आत्मा तोच ठेवून सभोवतालच्या वातावरणाचं ‘भारतीयीकरण’ करत बांदेकर आपल्या पुढ्यात एका विलक्षण रूपक कथेचं दृश्य चित्र रेखाटतात. ऑर्वेलने वापरलेले ओल्ड मेजर, स्नोबॉल ,नेपोलियन सारखी डुकरे ,बॉक्सर मोली असे घोडे ,बेंजामिन सारखे गाढव यासारखे प्राणी हे राजकीय सामाजिक संदर्भातील पात्रं रूपक म्हणून बांदेकरांच्या कादंबरी देखील येतात, ती वेगळ्या नावाने. कादंबरीच्या सुरुवातीस आदर्शवादी कृष्णा घोड्याची हत्या होऊन शिवारात नव्या मालकाच्या नावाखाली राजकारणाचे डाव खेळत काही प्राणी इतरांवर कुरघोडी करत कसे शोषण करतात व त्या विरोधात इतर प्राण्यांनी उभारलेला लढा याचे चित्रण आहे. वाचत असताना आजच्या वर्तमानातील राजकीय -सामाजिक -धार्मिक वृत्ती प्रवृत्तींचा पटकन संदर्भ लागत असतो वा तो लावण्याचा आपण कळत नकळत प्रयत्न करत असतो. सर्वसाधारण 2014 नंतर बदललेले भारतीय राजकारण, जनमानसाची टोकदार मते, विचारवंतांच्या हत्या,मॉब लिंचींग, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचे आक्रमण या पार्श्वभूमीवर कादंबरी पटकन रिलेट होते .साहेबराव डुक्कर, नानोपंत श्वान, म्हादू बैल,मोहिनी मांजर, बाजीराव गाढव हे प्राणी आणि त्यांचे स्वभाव विशेष यांच्यामागे लपलेल्या मिथकांना ओळखायला फारसे कष्ट पडत नाहीत. या मिथकांचा वापर अतिशय खुबीने करत बांदेकरांनी जागोजागी उपहास पेरून ठेवला आहे. ‘शिवार धमाका’ किंवा ‘एकच वाहिनी’ सारख्या माध्यमांनी चालवलेली सनसनाटी एकांगी राजकीय भूमिका पाहता आजच सकाळी टीव्हीवर पाहिले का असा प्रश्न चमकून जातो.

यासोबतच शोषणाविरुद्ध,अराजकतेविरुद्ध ठाम विरोधी भूमिका घेताना विशिष्ट आदर्शवादी तत्वज्ञानाशी बांधिलकी असणं..सिद्धांतांविषयी आत्यंतिक टोकाची भूमिका घेतानाच, वर्तमानात त्याच्या उपयुक्ततेच्या शक्याशक्यतांचा सारासार बुद्धीने आकलन करण्याचा अभाव,त्याचे सामाजिक लढ्यावरचे परिणाम याचेही ही प्रत्ययकारी चित्रण बांदेकरांनी केले आहे. अन्यायाशी दोन हात करतानाही नकळत उधळलेल्या जाती-धर्माच्या अस्मितांचे वारू कसे अनियंत्रित होत जातात आणि वाढत्या असुरक्षित वातावरणात नवनवे झेंडे कसे उदयास येतात, हे दाखवताना उद्याच्या प्राप्त राजकीय परिस्थितीतील बदलत जाणार्‍या दिशांतून ओघळणारे नवीन प्रश्न आपसूकच नजर शोधत राहते. शोषित समाजाचे अवघडलेपण, हतबलता, वर्गापरत्वे येणारा अंतर्विरोध या साऱ्यांचा सत्ताकेंद्रे आपल्या स्वार्थासाठी कसा पद्धतशीर वापर करतात याचं प्रतिकात्मक दर्शन बऱ्याच प्रसंगात घडतं. आऊटडेटेड झालेल्या तत्वज्ञानाला सजग तरुणांच्या आधुनिक विचारांची जोड देताना, सातत्याने चिकित्सक वृत्ती जोपासण्याचा मूलमंत्र देऊन कादंबरीचा समारोप होतो.

ऑर्वेलच्या कादंबरीच्या शेवटी दाटून आलेले नैराश्याचे मळभ न दाखवता बांदेकर त्यांच्या शैलीत उद्याच्या अभ्युदयाची किरणं दाखवत आशादायी चित्तप्रवृत्ती जिवंत ठेवतात. सबंध कादंबरीभर इतकी पात्र असून, इतक्या वेगवेगळ्या गतीने घडणाऱ्या घटना असूनही अतिशय प्रवाही भाषा असल्याने कुठेही थांबावसं वाटत नाही. एक समकालीन स्वतंत्र दर्जेदार कादंबरी म्हणून या साहित्यकृतीचे भविष्यात अस्तित्व असेलच, पण व्यक्तिगत माझ्या लेखी ..दाभोळकरांचा लेखकावर असणारा प्रभाव, त्यांची झालेली हत्या, त्या अनुषंगानं त्यांना जॉर्ज ऑर्वेलची मदत लागणं, त्या विचार सूत्राने झालेलं निर्भीड लिखाण, होणाऱ्या परिणामांची जाणीव असूनही व्यक्त झालेली प्रामाणिक ओजस्वी लेखन मूल्यं..यांची उंची खूप मोठी आहे,म्हणून या कादंबरीचं मला विशेष कौतुक वाटतं.

शेवटी 75 वर्षांच्या कालखंडानंतरही ज्याच्या अनुभवाच्या गाठोड्यातून,उत्कट प्रतिभाशक्तीतून, सहज उपजलेल्या विचारांचं कथाबीज, तिळमात्र न बदलता, समाज- राष्ट्र -विश्वाच्या जनमानसावर जसेच्या तसे लागू पडते, त्या जॉर्ज ऑर्वेलला साष्टांग दंडवत तर आपल्या मार्मिक लेखन शैलीतून आशयघन वैश्विक निर्मितीमूल्यांना अधिक श्रीमंत करतानाच भारतीय वर्तमानाला आरसा दाखवल्याबद्दल बांदेकरांना कडक सॅल्यूट!!

अपूर्णत्व

‘स्व’त्वाच्या अनामिक कोशातून बाहेर पडलेल्या कुठल्याही जीवाला पडणारा प्रश्न तितकाच मूलभूत,तितकाच अगतिक नसेल का?वांझोट्या वर्तमानासोबत दैदिप्यमान भूतकाळाशी यथाशक्ती प्रामाणिक असल्याची आशा असलेला भविष्यकाळ डोळे किलकिले करून दबा धरून बसलेल्या श्वापदाप्रमाणे अंगावर येणारच नाही याची खात्री काय?तमाम इच्छा आकांक्षांचे ओझे अंगावर झुलवत तापलेल्या सूर्यासोबत वाटेचे अंतर सपासप कापत जाते अन प्रश्नांचा गुंतावळा वाढत जातो. एव्हाना बोचऱ्या प्रश्नांची टोके आता अणकुचीदार झालेली असतात, सूर्यही आग ओकत राहतो. मोहाची एकूणएक लक्तरे अवशेषासकट वेशीवर टांगून आलेल्या संन्याशाप्रमाणे समोरचा रस्ता त्याला भेसूर तरी अर्थपूर्ण वाटायला लागतो. कितीही नकोसं वाटलं तरी तो चालायचं थांबत नाही. हा हा म्हणता सूर्य मान टाकतो अन संध्याकिरणांची नक्षी आसमंताला भिजवून टाकते,तशी प्रश्नांची उकल अधिकाधिक क्लिष्ट होत जाते.धापा टाकत चालणारा गडी आडोशासाठी आसरा शोधता शोधता थकून जातो.इकडे सांजप्रहर उलटून रात्र मध्यान्हाकडे झुकायला लागते.. आताशा जमिनीकडे पाठ टेकलेला गडी अनिमिष डोळ्यांनी फाटक्या आभाळाकडे टक लावून पाहत राहतो..डोक्यातल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर सापडलं नसल्याने झोप येण्याची पुसटशीही शंका राहत नाही..कूस बदलून,पाखरांना दगडं मारून,जोरजोरात ओरडून, कशानेही समाधान होत नाही..रातकिड्यांचे सततचे आवाज रात्रीच्या धीरगंभीर स्वभावाशी तादात्म्य पावत असतात. अस्वस्थतेची इंगळी डसलेला गडी सगळे प्रयोग करून निमूटपणे जागेवर येऊन पडतो.. तसा त्याच्या नजरेसमोर येतो अर्धमुर्धा चांदवा!! थोडंसं निरखून तो त्याच्याकडे पाहतो अन क्षणात डोक्यात वीज चमकते…होय..होय..हेच ते..हेच ते..!!
अपूर्णत्व!!
डोक्यातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याला सापडलेले असते.. पहाटेच्या दवासवे अलगद डोळ्यात उतरलेल्या निद्रेला चिरंतन समाधानाच्या उबेसकट तो शरण जातो नि दूर कुठेतरी अगम्य ठिकाणी एक गाठ सुटते..!!
– अशफाक

My first book

It gives me great pleasure to inform you all about my first poetry book… Written in Marathi language.. Published by Muktarang Prakashan, latur. I just.. can not describe the feeling at this present moment..It will be cherished throughout my entire lifetime..!! All of my blogger friends played major role in improving my writing skills.. making me able to convert rough scribbles into meaningful lines.. This book is available on bookganga too…You can order online from any place across the globe.. search in Marathi section…www.bookganga.com..Thanks for all the support and love..!!☺️☺️☺️